आमची मोठी आई भाग ६
मी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला.
उर्वरित वाचालहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही!
उर्वरित वाचाजुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो
उर्वरित वाचाबोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत.
उर्वरित वाचाआमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘१०४ नाबाद’, आहे! नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे
उर्वरित वाचाकोणत्याही यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.
दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …
उर्वरित वाचाज्या महानुभावांनी आमच्या संघाची 104 वर्षांपूर्वी स्थापना केली व समाज उपयोगी संस्था उभारल्या,त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते झालेलो आहोत. या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर ही प्रगती झाली नसती. आपण कितीही हुशार असलो कर्तुत्ववान असलो तरी ज्या नेत्यांनी व शैक्षणिक संस्था मुळे आपण शिकलो त्याची जाणीव ठेवून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात त्यांचे योगदान आपण मानले पाहिजे असे मला तीव्रतेने वाटते. त्या दृष्टीनेच आमच्या अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक अशा लोकत्तर नेत्यांची चरित्रे आपण लक्षात घेतली पाहिजेत.
उर्वरित वाचाइंग्रजांचे वर्चस्व असताना, लोकमान्यांच्या हाकेला ओ देऊन, भारत भूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणा-या व त्यासाठी तन, मन, धन समर्पित करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये आमच्या बोर्डीचे सिंह कै. महादेव लक्ष्मण राऊत उर्फ सर्वांचे माधवमामा हे एक असेच धडाडीचे नेतृत्व होते. ते म्हणत “ज्या अर्थी मला राष्ट्रसेवा करावयाची आहे तर ब्रिटिशसत्ते विरुद्ध संघर्ष अटळ आहे. या सत्तेविरुद्ध संघर्ष म्हणजे परिणामांच्या सिद्धतेलाही तयारी असली पाहिजे आणि माझी तयारी झाली आहे!”
उर्वरित वाचाआपल्या व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कोणतीच ददात नसतांना, स्वतःला, शिक्षणामुळे नोकरी वा व्यवसायात पैसा मिळवण्याची उत्तम संधी असूनही, अंधश्रद्धा व अज्ञानाने घेरलेल्या समाज बांधवासाठी आपण काहीतरी केले पाहिजे,नव्हे ते आपले कर्तव्य आहे असे मानून पिताश्रींनी दिलेला समाजसेवेचा वारसा पुढे चालविणे हे आपले जीवनातील ध्येय ठरवून, त्याप्रमाणे,आयुष्यभर वाटचाल करतांना, प्रसंगी कुठे दुर्लक्ष झाले, व्यवसायात नुकसान झाले, कामाचे श्रेय नाही मिळाले, तरीसुद्धा आपल्या ध्येय पथावरून विचलित न होता, हाती घेतलेले समाजसेवा व्रत न सोडता, 91 वर्षाचे दीर्घायुष्य सार्थकी लावणाऱ्या माननीय कैलासवासी चिंतामणराव वर्तक उर्फ अण्णा व ज्या पित्या कडून हा सचोटी व समाजसेवेचा वारसा अण्णांना मिळाला त्या पिताश्री बळवंतराव वर्तक या पिता-पुत्रांच्या जोडीविषयी मी आज लिहणार आहे!
उर्वरित वाचा