कोणत्याही यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.
दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …
उर्वरित वाचा