मी मोठी आई बोलते भाग ११
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो .
उर्वरित वाचामहाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचा देशव्यापी मोठा संप झाला. सर्व शिक्षकांना घरी बसावे लागले. पगारही बंद झाला. आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो .
उर्वरित वाचाखरे तर देवजी बाबा एका पायाने थोडे अधू होते. चालताना लंगडत. मात्र देवीचा संचार अंगात झाल्यावर ते त्या अधूपायावर गोल गिरक्या घेत. तरीही स्थिर असत. त्यांची वाणी त्यावेळी धारदार होत असे. भविष्यवाणी खरी करत असल्याने लोकांचाही त्यांच्यावर विश्वास होता.
उर्वरित वाचाआपल्या फेड न झालेल्या कर्जाची व ऋणकोंची तिला पूर्ण जाणीव होती. अंथरुणाला खिळल्यावर काही लोकांची नावे घेत ती बडबडत राही. लबाड लोकांनी त्याचा फायदा घेतला. ते कानावर हात ठेवीत. “आम्ही पैसे घेतलेच नव्हते ..”असेही सांगत.
उर्वरित वाचादेवघरातील ही मंद वात आता आई वडिलांच्या स्मृतींची आठवण देत राहील…
उर्वरित वाचामोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी.
उर्वरित वाचाभावाकडील वास्तव्यात एक फायदा झाला होता, मावशीने शेतीमालाच्या बाजाराची, खरेदी विक्रीची चांगली माहिती करून घेतली होती. हा अनुभव तिला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला. आपल्या आईचे आशीर्वाद व भावाच्या शुभेच्छा घेऊन तीही आमच्या बोर्डाच्या घरी दाखल झाली. तिच्या व आम्हा सर्वांच्याच जीवनात एक नवा कालखंड सुरू झाला. आम्हा सर्वांच्या आयुष्याला एक नवे वळण, सकारात्मक दिशा व आत्मविश्वासाचा मार्ग दिसू लागला..!
उर्वरित वाचामी उपाशी राहिले पण कोणाकडे हात पसरले नाहीत. कोणालाही भरल्या ताटावरून उठविले नाही. गरीबी असे मौल्यवान धडे देते!
उर्वरित वाचामला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध गुरूजी म्हणून आला.
उर्वरित वाचालहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही!
उर्वरित वाचाजुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो
उर्वरित वाचा